Mahayuti Rift: 'ठाण्याचा महापौर BJP चाच होणार', आमदार संजय केळकरांनी शिंदे गटाला दिले खुले आव्हान
Continues below advertisement
ठाणे महानगरपालिकेत (Thane Municipal Corporation) महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्ष असलेल्या भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडल्याचे चित्र आहे. 'ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे', असे वक्तव्य आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी केले आहे. एकीकडे, खासदार नरेश मस्के (Naresh Maske) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या अडथळ्यांविरोधात नाराजी व्यक्त करत स्वबळाचा नारा दिला आहे. मस्के यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, भाजपने देखील स्वबळाची तयारी सुरू केली असून, ३३ प्रभागांतील इच्छुकांसाठी शिबिरं आयोजित केली आहेत. या सर्व घडामोडींमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजप मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील कोल्ड वॉरही तीव्र झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement