Maharashtra Politics Mahapalika Elections : आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा सूर
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) मनसेच्या (MNS) समावेशावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला आघाडीत घेण्यावरून मतभेद समोर येत असताना, काँग्रेसने (Congress) मात्र स्वबळाची भूमिका घेतली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता सध्या स्वबळावर निवडणूक लढवण्याची झाली असून, बैठकीत 'त्यांनी एकटं जायला पाहिजे,' असा सूर उमटत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेसोबत विचारसरणी जुळत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील जागावाटपाचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. एकीकडे शिवसेना (UBT) मनसेसोबतच्या आघाडीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचा स्वबळाचा नारा महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता दिल्लीतील काँग्रेस हायकमांड यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement