Refinery Project Ratnagiri मध्येच होणार! राजापुरातील बारसूचा प्रस्ताव

Maharashtra CM Letter to PM over Nanar Project : रिफायनरीच्या प्रकल्पावरून आता नवीन आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना 14 फेब्रुवारी 2022 रोजी पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. त्या पत्रात त्यांनी नाणार रिफायनरीसाठी (Nanar Project) लागणारी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांचा आणि भागांचा या पत्रामध्ये उल्लेख केल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola