Nanar Refinery Project | नाणार प्रकल्पावरुन 'राज'कारण तापणार?
त्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात राजकारण सुरू आहे. या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. मात्र या प्रकल्पासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समर्थन जाहीर केलंय. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलंय. करोनोत्तर महराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल, तर नाणार रिफायनरीसारखा प्रकल्प हाताततून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कोणी काहीही म्हणू दे महाराष्ट्र फर्स्ट असं धडाकेबाज धोरण असायला हवं,” असा सल्लाही राज यांनी दिला आहे. दरम्यान, स्थानिकांना नको असेल तर हा प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेनेची आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज यांच्या पत्रावर काय उत्तर देतात