Rahul Gandhi :'तुमचं सरकार चोरीचं, फेक सरकार आहे'; २५ लाख मतांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप!
Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन हरियाणातील (Haryana) मतदार यादीत (Voter List) मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आणि २५ लाख मतदार बनावट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'तुमची सरकार चोरीची आहे, ही एक फेक सरकार आहे', अशा थेट शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. या घोटाळ्यामुळे हरियाणात काँग्रेसचा विजय हिरावून घेतला गेला, असा दावा त्यांनी केला. गांधी यांनी पुरावे सादर करत म्हटले की, एकाच फोटोचा वापर करून २२३ बनावट मतदार तयार केले गेले आणि उत्तर प्रदेशातील (UP) भाजपचे सरपंच हरियाणामध्येही मतदान करत आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) भाजपच्या संगनमताने हे सर्व करत असून, लोकशाही नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement