Vote Theft Row: 'निवडणूक आयोग भाजपाची व्यवस्था आहे', Rahul Gandhi यांचा घणाघात

Continues below advertisement
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'निवडणूक आयोग ही भाजपाची व्यवस्था आहे', असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला. मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केले. काही दिवसांपूर्वी आपण हरियाणातील मतचोरीचे पुरावे सादर केले होते आणि त्याच धर्तीवर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही मतचोरी झाल्याचा दावा त्यांनी केला. आपल्याकडे मतचोरीसंदर्भात आणखी माहिती असून ती लवकरच जारी करू, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे. लोकशाही आणि संविधानावर हा थेट हल्ला असल्याचे ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola