Priyanka Gandhi on Lakhimpur Violence : तुमची नियत साफ असेल तर, न्याय द्या : प्रियंका गांधी

वर्षभरानं का होईना मोदींनी राजधानीच्या वेशीवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय दिला. तसाच न्याय पंतप्रधान या नात्यानं मोदींनी लखीमपूर हिंसाचारातील मृत आणि पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्याची मागणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी केलीय. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज लखनऊ दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी लखीमपूर हिंसाप्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रावर शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आऱोपही प्रियंका गांधींनी केला. लखीमपूर हिंसाप्रकरणातील पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी  गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी प्रियंका गांधींनी केलीय..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola