Mumbai Hostage Crisis: 'सरकारनं दोन कोटी थकवले', Rohit Arya चा गंभीर आरोप, Kesarkar कनेक्शन समोर
Continues below advertisement
पवईमधील (Powai) एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने १७ मुलांना ओलीस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. 'सरकारनं माझे दोन कोटी रुपये थकवले आहेत', असा थेट आरोप रोहित आर्यने केला आहे. केसरकर शिक्षणमंत्री असताना याच रोहित आर्यने 'स्वच्छता मॉनिटर अभियाना'च्या कामाचे पैसे थकवल्याच्या कारणावरून उपोषण केले होते. मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आर्यने आग लावण्याची धमकीही दिली होती, ज्यामुळे पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत असून, जसजसा तपास पुढे जाईल तसतसे यामागील नेमके कारण आणि आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित आर्य हा पुण्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement