Police Action | नाशिकमध्ये दोनशे तळीरामांवर कारवाई | ABP Majha
नाशिक शहरातही 31 डिसेबरच्या पार्श्वभूमीवर 200 तळीरामांवर कारवाई करण्यात आलीय तर 120 टवाळखोरांवर शांतता भंग केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. शहरात एकूण 52 ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. 150 अधिकार्यांसह एकूण पंधराशे पोलिस रस्त्यावर उतरले होते. वाहनचालकांची ब्रिथ अनालायझरच्या साहाय्याने तपासणी केली जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच १५३६ वाहनांची तपासणी करण्यात येऊन 141 वाहनधारकांना नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंडही ठोठावण्यात आलाय.