Digras : लग्नातील 400 ते 500 वऱ्हाडांना विषबाधा, उपआरोग्य केंद्रात उपचार सुरु | ABP Majha
नांदेडच्या दिग्रसमध्ये जेवणातून 400 ते 500 वऱ्हाडींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी दिग्रस येथील एका लग्न सोहळ्यात जेवणातून वऱ्हाडींना विषबाधा झाली. काल मध्यरात्रीपासून गावातील नागरिकांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर विषबाधा झालेल्या नागरिकांना तात्काळ उपआरोग्य केंद्र दिग्रस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं.