PM Modi : 10 वर्षांत स्वस्त मोबाईल,स्वस्त डेटा अन् बँकेतील जनधन खात्यांनी भारताचा चेहरामोहरा बदलला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi : 10 वर्षांत स्वस्त मोबाईल,स्वस्त डेटा अन् बँकेतील जनधन खात्यांनी भारताचा चेहरामोहरा बदलला
मुंबई: गेल्या 10 वर्षांमध्ये आमच्या सरकारच्या काळात भारतातील बँकिग व्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स असणारी जनधन खाती या त्रिवेणी संगमाने भारतात कमाल केली आहे. पूर्वी लोक भारतात यायचे तेव्हा येथील सांस्कृतिक विविधता (कल्चरल डायव्हर्सिटी) पाहून थक्क व्हायचे. मात्र, आज जगातील लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा येथील फिनटेक डायव्हर्सिटी पाहून भारावून जातात, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील जिओ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024'च्या व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जगभरातून आलेल्या उद्योजकांच्या समोर आपल्या सरकारच्या निर्णयांचा पाढा वाचताना पूर्वीच्या काँग्रेसशासित राजवटीवर टीका केली. त्यांनी म्हटले की, गेल्या 10 वर्षांमध्ये भारतातील फिनटेक क्षेत्रात 31 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. या काळात देशातील फिनटेक स्टार्टअपमध्ये 500 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन खात्यांनी भारतात कमाल केली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.