Pandharpur Yatra: मराठवाडा, विदर्भावर अतिवृष्टीचं सावट, कार्तिकी यात्रेडे भाविकांनी फिरवली पाठ

Continues below advertisement
पंढरपूरमधील (Pandharpur) कार्तिकी यात्रेवर (Kartiki Yatra) अतिवृष्टी आणि महापुराचे (Floods) सावट पसरले आहे. कार्तिक शुद्ध दशमीनिमित्त मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातून हजारो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मात्र, अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका बसलेल्या मराठवाडा आणि विदर्भामधल्या भाविकांनी यंदाच्या वारीकडे पाठ फिरवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अतिवृष्टीमुळे या भागांतील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक गावे पाण्याखाली गेली होती, ज्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या गर्दीने चंद्रभागेचा तीर फुलून गेला असताना, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील दिंड्यांची संख्या घटल्याने यात्रेवर संकटाचे सावट असल्याचे दिसून येते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola