Pandhapur : निर्बंध वाढवा पण पुन्हा विठ्ठल मंदिर बंद नको, भाविकांची मागणी

ओमिक्रोन चा धोका वाढू लागल्यानंतर राज्यात निर्बंध अधिक कठोर होण्याच्या चर्चा सुरु झाल्याने पुन्हा मंदिरे बंद होणार या भीतीने हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येत असून निर्बंध वाढावा पण मंदिर खुले ठेवा अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे . एका बाजूला तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे प्रशासन रोज नवनवीन निर्णय जाहीर करू लागल्याने सध्या सोशल मीडियावरही अफवाना पेव फुटले आहे . राज्यातील मंदिरे बंद होणार अश्या चर्चा सुरु झाल्यामुळे देशभरातून सध्या रोज हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत . देवाच्या दर्शनामुळे आमची ताकद वाढते आता आम्ही दोन्ही लस घेतल्या आहेत , असतील ते निर्बंध पाळतो मात्र आम्हाला ताकद देणारे विठुरायाचे मंदिर पुन्हा बंद करू नका अशी मागणी भाविकांनी राज्य सरकारकडे केली आहे . 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola