लग्नाला आहेर नको, अवयव दानाचा संकल्प करा, आव्हाड आणि नागरे कुटुंबियांचा आदर्श लग्नसोहळा!
संगमनेर शहरातील वसंत लौन्स या ठिकाणी आव्हाड आणि नागरे या कुटुंबियांचा विवाह सोहळा पार पडला. मोठा हॉल, आकर्षक सजावट यासह लग्नाला लागणारी प्रत्तेक गोष्ट या ठिकाणी होतीच मात्र यात लक्ष वेधून घेतले ते अवयव दानाचा संकल्प करणाऱ्या संदेश फलकांनी. दोन्ही कडच्या वऱ्हाडी मंडळींना आहेर नको मात्र अवयव दान करा म्हणत हा सोहळा पार पडला. यावेळी वर-वधूसह उपस्थित 101 वऱ्हाडी मंडळींनी अवयवदानाचा संकल्प करत अर्ज भरले. या विवाह सोहळ्याप्रसंगी राबविलेल्या उपक्रमाचे कौतूक होत असून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यावेळी उपस्थित होते.