OBC Protest : २ सप्टेंबरचा जीआर रद्द करा, ओबीसींचा नागपुरात इशारा
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चात (OBC Elgar Morcha) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'जर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) जीआर (GR) रद्द झाला नाही, तर आम्ही मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune) आणि ठाणे (Thane) जाम केल्याशिवाय राहणार नाही,' असा थेट इशारा वडेट्टीवार यांनी दिला. सरकार मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यापुढे झुकल्याचा आरोपही त्यांनी केला. या मोर्चाकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि बबनराव तायवडे (Babanrao Taywade) यांनी पाठ फिरवल्याने ओबीसी नेतृत्वात फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेलंगणा (Telangana) सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींना ४२ टक्के आरक्षण देण्याची धमक दाखवा, असे आव्हानही वडेट्टीवार यांनी सरकारला दिले. 'माझा डीएनए ओबीसी आहे, खुर्चीवर बसल्यावर तुम्हाला त्याचा विसर कसा पडला?', असा सवाल करत त्यांनी सत्तेत असलेल्या नेत्यांवर टीका केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement