Nitesh Rane on MVA | स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याच बघाव वाकून, नितेश राणेंची मविआवर टीका

Continues below advertisement

Nitesh Rane on MVA | स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याच बघाव वाकून, नितेश राणेंची मविआवर टीका
स्वतःचं ठेवावं झाकून दुसऱ्याच बघाव वाकून अशी नेहमी प्रमाणे महाविकास आघाडीची सवय असल्याने आमदार बाबा सिद्दिकी याच्या हत्येवरून देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करून घाणेरडे राजकारण करत आहेत.  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री सर्व माहिती घेऊन पूर्णपणे पोलीस यंत्रणा तपास कामासाठी लावली आहे.   बाबा सिद्धीकी यांची मर्डर का झाली याची चौकशी सुरू असून लवकरच याची माहिती समोर येईल.  या घटने संदर्भात तत्परतेने तपास करणारं महायुतीचे सरकार आहे, मात्र एवढी तत्परता महाविकास आघाडीच्या काळात होती का? त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.    महाविकास आघाडीच्या काळात मातोश्रीच्या वहिनींचा म्हणजेच रश्मी ठाकरे यांचा पोलिसांच्या बदल्या करण्यात किती मोठा हस्तक्षेप होता,  हा कधीतरी पुराव्यासहित दाखवावे लागेल, तेव्हा कंटेनर मधून पैसे बाहेर पाठवलं जाईल. आमच्यावर बडल्या करून पैसे घेण्याच्या आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा इतिहास तपासावा.   सचिन वाझे वर्षावर मुख्यमंत्री बंगल्यावर राहायचे, वसुली सरकार म्हणून महाविकास आघाडीचं सरकार म्हणून नाव का? पडलेलं.   परमवीर सिंग यांनी पत्र लिहून काय काय आरोप केले होते महाविकास आघाडीवर, तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अवगत केलेलं असं पत्रात लिहिलेलं.  आमच्या सरकारमध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडत नाही, तिथल्या तिथेच त्या आरोपींना शिक्षा देणं, बदलापूर असेल किंवा बाबा सिद्दिकी यांची केस असेल यामध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही.   संजय राऊत सुरक्षित नसता तर एवढं थोबाड उघडू शकला असता का? एका महिलेवर वारंवार अत्याचार करून देखील शुद्धीत असता का? संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय आज महाराष्ट्रात मोकळा श्वास घेतोय ते फक्त आणि फक्त आमच्या सरकारमुळेच.   कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम सरकारचं असून ते आम्ही नीटपणे करत असल्यामुळे यांना कुठलाही मुद्दा आमच्यावर टीका करण्यासाठी मिळत नाहीये. म्हणून हे खालच्या पाठीवरची टीका आमच्यावर करत आहेत.   राहुल गांधींना आता महाराष्ट्रातील कायदा आणि सुरक्षित बाबत चिंता वाटत आहे. जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना वसुली मध्ये गृहमंत्र्यांना अटक झाली, तेव्हा ट्विट करावस का वाटलं नाही, आता राहुल गांधींच्या पुकटच्या सल्ल्यांना महत्त्व राहत नाही.   अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून संजय राऊत आमच्यावर आरोप करू शकत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात अनिल देशमुख हे एकमेव गृहमंत्री आहेत, ज्यांना जेलमध्ये जावं लागलं.   आमचे तीन तीन सिंघम आहेत. तुमच्यासारखे शक्ती कपूर नाहीत, सिंघम आल्यानंतर गुंड पळून जातात, घाबरतात. महाविकास आघाडीमध्ये १०० शक्ती कपूर आहेत. आमचा सिंघम बदलापूर मध्ये काय केलं हे तुम्ही पाहत असालच, येणाऱ्या काळात देखील तुम्ही पाहाल.   मोदींना हरवणे म्हणजे हिंदू समाजाला हरवणे, मोदींना हरवला म्हणजे हिंदू राष्ट्राला कमी लेखन. असदुद्दीन ओवेसी ला आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचा आहे, म्हणून यांना मोदींना हरवायचं आहे. मात्र देशातील हिंदू समाज मोदींना कधीच हरू देणार नाही. त्यामुळे आमच्या हिंदुस्तानवर भगवाच फडकणार, पाकिस्तानचे झेंडे लावू देणार नाही.  उद्धव ठाकरेंकडे शिवसैनिक राहिले किती, कालच्या सभेत अनेक जण उठून जात होते. कालच्या सभेत उद्धव ठाकरे एरंडेल घेऊन बोलत असल्याचा वाटत होत. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या शिवसैनिकांना त्यांचे भाषण ऐकण्यासारखं वाटलं नाही.   उद्योगपतींचा जीव जावा अशी इच्छा व्यक्त करणारा, उद्धव ठाकरे नालायक माणूस आहे. उद्धव ठाकरे ला माणुसकी नाही तो स्वार्थी माणूस आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल कमी बोलणं हे चांगलं नाही तर दिवस वाईट जाईल.   एक महिन्यामध्ये कदाचित पाकिस्तान मध्ये सरकार येत असेल, आमच्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार यायला जागा नाही. त्यामुळे पेंग्विन ने उगाच स्वप्न पाहू नयेत.   काल उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टपणे सांगितलं की महाराष्ट्रात चुकून आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद करू, त्यामुळे महाराष्ट्रातील बहिणीने याची नोंद घ्यावी.   औरंग्याच्या पिल्लावळणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या मिरवणुकीत हिरवे झेंडे फडकवले जातात. अल्लाहू अकबर चे नारे दिले जातात. पाकिस्तान जिंदाबाद बोललं जातं. त्याच उद्धव ठाकरेंच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पण येऊ नये.   गजनी झालेल्या उद्धव ठाकरे ला थोडी आठवण करून देईन, मालवण मध्ये असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिव मंदिराला 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेला किमान दहा वर्ष होत आली आहेत. मालवण मधील शिव मंदिराला 50 लाख रुपये देऊ शकत नाही, मग जिल्हा जिल्ह्यात काय महाराजांची मंदिर बनणार आहात. अशा औरंग्याच्या पिल्लावळला औरंग्याकडे पाठवण्याची वेळ आली आहे.  रत्नागिरी मधील संचलनाच्या वेळी ज्यांनी घोषणा दिल्या त्या सगळ्यांचा हिशोब होणार. त्यांच्या जीवा अशा पद्धतीने छाटू की त्यांच्या तोंडातून पुन्हा अल्लाहू अकबर च नाव येणार नाही.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram