Majha Maharashtra Majha Vision : केंद्र सरकारकडे ऐकण्याची क्षमता कमी, केंद्रीय संस्थांचा गैरवापर : Supriya Sule
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2021 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Maharashtra Majha Vision : आणीबाणीचा काळ देशाला न शोभणारा काळ असं बोललं जातं. आणीबाणीच्या काळाची आजही चर्चा होते. सध्याही तशीच परिस्थिती देशात दिसून येते आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारवर निशाणा साधला. आज सर्रासपणे केंद्रीय संस्थांचा गैरवापर होताना दिसतो आहे. अनेकांवर सूडबुद्धीने कारवाई होताना दिसतेय. मागे एका वर्तमानपत्रांवर ईडीची छापेमारी झाली. काही पुस्तकांना टोकाचा विरोध होतांना दिसतो. अशा घटना समोर येत आहेत. गेल्या पाच-सात वर्षात ही अस्वस्थता समोर येत आहे. या गोष्टी माझ्यासाठी आणि माझ्या सारऱ्या अनेकांसाठी खूप नवीन आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हणत केंद्र सरकारवर टीका केली.