राजकीय कार्यक्रम घेऊन गर्दी न जमवण्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना Nawab Malik यांचं आवाहन
"कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या.", असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत Nawab Malik यांनी राजकीय कार्यक्रम घेऊन गर्दी न जमवण्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केल आहे.