NEP : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी समिती स्थापन; दहावी, बारावीच्या बोर्डाचं महत्त्व कमी करणार?
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून दहावी, बारावीच्या बोर्डाचं अवास्तव महत्त्व कमी करणार असल्याचं समजतंय. विज्ञान, वाणिज्य आणि कला असे भेद टाळून विषय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना असणार आहे. त्याचसोबत, नववी ते बारावीपर्यंत अभ्यासासाठी 40 विषयांचे पर्यायही उपलब्ध करण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, निकालांचं मूल्यांकन गुणांसोबतच कौशल्यावर आधारित असणार आहे.