Narayan Rane : किती मर्डर पचवणार हे सरकार?; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेृत्वावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सवाल उपस्थित केलेत.अशा वेळी मुख्यमंत्री झालो जेव्हा पाकिस्तान, दुबईतून मुंबईवर हल्ले होत होते. त्यावेळी दहशतवाद निपटून काढला आणि ९० लोकांना वर पोहचवलं, असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सॅलियन यांच्या मृत्यूविषयी बोलतानाही आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.. मंत्री संजय राठोड यांनी पराक्रम केला. हे सरकार आणखी किती मर्डर पचवणार असा सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली.