Nandurbar Accident: 'चालकाचं नियंत्रण सुटलं', अस्तंबा यात्रेवरुन परतणाऱ्या 8 भाविकांचा मृत्यू

Continues below advertisement
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अस्तंबा यात्रेवरुन (Astamba Yatra) परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला चांदशैली घाटात (Chandshaili Ghat) अपघात झाला आहे. 'वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे'. या भीषण अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला असून, दहापेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात (Taloda Sub-District Hospital) दाखल करण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola