Nanded मधील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा, पथकं नेमली पण ती फक्त कागदावरच!

नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महिनाभरापूर्वी महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त पथके स्थापन झाली असली तरी नांदेड शहरानजीक गोदावरी नदी पात्रातून हजारो तराफ्याद्वारे भरदिवसा वाळू उपसा होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेली बंदूकधारी पथके मात्र नदी पत्रावर कुठेही पाहण्यास मिळत नाहीत.त्यामुळे ही पथके आता  फक्त कागदावरच उरली असल्याचे पाहायला मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola