नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेली चिखलफेक थांबवा, नाना पटोले, संजय राऊतांचा सल्ला

Continues below advertisement

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेली चिखलफेक थांबवा असा सल्ला काँग्रेस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मलिक यांचं कौतुक करून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मलिक यांचं कौतुक केलं. रोजच सुरू असलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. तर मलिक यांनी घेतलेली भूमिका पुढे सुरू ठेवावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचं कळतं.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram