Maharashtra Politics: 'धुळ्यात एकत्र लढून महायुतीला शह देणार', Ramraj Nikam यांचा विश्वास

Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने (मविआ) कोल्हापूर, धुळे आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शिवसेना (UBT) नेते विनायक राऊत व सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. 'धुळ्यामध्ये एकत्र लढून महायुतीला शह देणार', असा विश्वास शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रामराज निकम यांनी व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार असल्याने त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचा दावा केला जात आहे, तर धाराशिवमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मविआचा भाग म्हणून निवडणूक लढणार आहे. कोल्हापुरातील निर्णयामुळे महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola