Satyacha Morcha : मतदात्यांच्या घोळाविरोधात सत्याचा मोर्चाला दुपारी 1 वाजता सुरवात होणार
Continues below advertisement
महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभाराविरोधात मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला आहे. मनसे नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी निवडणूक आयोगाला ठाम इशारा देत म्हटले, 'हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय लालसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे या मोर्चाला किंवा आम्ही मांडलेल्या कुठल्याही प्रश्नांना कृपया हलक्यात घेऊ नका'. मतदार याद्यांमध्ये (Voter Lists) मोठा गोंधळ असल्याचा आरोप करत, जोपर्यंत याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आयोगाचे अधिकारी प्रश्नांना उत्तरे देत नसल्याचा आणि गोंधळलेले असल्याचा दावाही अभ्यंकर यांनी केला. हा मोर्चा म्हणजे शेवट नसून सुरुवात आहे आणि गरज पडल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement