Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या अविष्कार स्पर्धेच्या कार्यक्रमात गोंधळ | ABP Majha
14 व्या आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुंबई विद्यापीठाने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मात्र यावेळी बक्षीस आणि निरोप समारंभ कार्यक्रमात कोल्हापूर आणि जळगाव विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपदावर आक्षेप घेत गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. परीक्षकांनी आपलं म्हणणं ऐकून न घेता मुंबई विद्यापीठाच्या टीमला विजेतेपद घोषीत केल्याने या गोंधळ उडल्याच समोर आलं