Prithviraj Chavan | एप्रिल-मेपासून चीननं गलवान खोऱ्यात किती वेळा अतिक्रमण? : पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, चिनी सैनिक तंबू बांधण्याचं आणि बंकर बांधण्याचं काम करत आहेत अशी माहिती आली आहे. पंतप्रधानांनी विरोधी पक्षाच्या बैठकीत गंभीर वक्तव्य केलं की भारतात कोणीही घुसलेलं नाही असं वक्तव्य का केलं? याचा चीन गैरफायदा घेत आहे. असं का उत्तर दिलं याच त्यांनी अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही.

चीनचे पंतप्रधान आणि आपले पंतप्रधान यांची चांगली मैत्री आहे. ते 19 वेळा भेटले आहेत. अहमदाबादला त्यांचा सत्कारही केला. चीनच्या पंतप्रधान यांना न दुखवण्यासाठी आपले पंतप्रधान असं वक्तव्य करत आहेत का? असा सवाल चव्हाण यांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola