Mumbai :मुंबईतील उदयान, मैदान खुली होणार, हॉटेल आणि रेस्टॉरंटबाबत दिलासा - ABP Majha
मुंबईत डिसेंबरअखेरपासून आलेली कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली असून दैनंदिन रुग्णसंख्या चार पटींनी घटली आहे. त्यामुळे मुंबईत लवकरच सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत मैदाने-उद्याने सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय हॉटेल-रेस्टॉरंटची रात्री 10 वाजेपर्यंत असणारी वेळ एक तासाने वाढवून रात्री 11 पर्यंत करण्यात येणार आहे. मात्र लग्नसोहळे, कार्यक्रम, जीममध्ये मात्र सद्यस्थितीत 50 टक्के उपस्थितीचा नियम कायम राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.