Mohan Bhagwat : मुस्लिम लोकांनी देशावर आक्रमण करणाऱ्यांवर आपली निष्ठा व्यक्त करु नये : सरसंघचालक मोहन भागवत
देशात चांगल्या वाईट घटना घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी. प्रत्येकाने मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे. व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपूरात दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.