महत्वाचे विभाग वगळता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात काटछाट होण्याची शक्यता : विजय वडेट्टीवार
पुढच्या महिन्यात पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे. मात्र जे कोरोनासाठी काम करतायत त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबत थोडसं मागे पुढं होऊ शकतं. चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.