Latur Flood : 'खायचं काय?', Latur मध्ये Manjra नदीच्या पुराने 200 एकर शेतीचं वाळवंट!
Continues below advertisement
मराठवाड्यातील (Marathwada) अतिवृष्टी आणि पुरामुळे लातूरच्या (Latur) कौरी गावातील शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. मांजरा (Manjra) नदीला आलेल्या पुरामुळे गावातील तब्बल 200 एकर सुपीक जमीन वाळवंटात बदलली आहे. 'शेतचं सगळंच... शेतचं समजा वाळवंट परदेश झालंय आमचं,' अशी व्यथा येथील एका शेतकऱ्याने मांडली आहे. गेल्या दीड महिन्यात सात वेळा पूर आल्याने सोयाबीनचे (Soybean) पीक पूर्णपणे वाहून गेले आणि शेतात फक्त वाळूचे ढिगारे साचले आहेत. विशेष म्हणजे, एवढं मोठं नुकसान होऊनही प्रशासनाने वेळेवर पंचनामे (Panchnama) केले नाहीत आणि लोकप्रतिनिधींनीही गावाला भेट दिली नाही, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. प्रशासनाच्या उशिरा झालेल्या पंचनाम्यानंतर मदतीची अपेक्षा असली तरी, 'पुढची दोन वर्षे शेती नीट होणार नाही, मग खायचं काय?' हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement