Marathi Language Row | अबू आझमी यांच्या 'मराठीची गरज काय' वक्तव्यावरून वाद, MNS-BJP चा हल्लाबोल
सपा नेते Abu Azmi यांच्या 'मराठीची गरज काय' या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. भिवंडी-कल्याण रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. Abu Azmi यांनी विनाकारण हिंदी-मराठी वादाला फोडणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 'उत्तर प्रदेशातल्या लोकांना मराठी कशी समजेल' असा प्रतिसवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) Abu Azmi यांना आपल्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे, तर भारतीय जनता पक्षाने (BJP) देखील त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भाषावादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.