Uddhav Thackeray Farmer Relief |प्रति हेक्टरी 50 हजारांची मदत द्या, उद्धव ठाकरेंची मागणी

Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडे मदतीची मागणी केली. त्यांनी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. ठाकरे यांनी सांगितले की, पंचनामे बाजूला ठेवून प्रत्यक्ष परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना मदत दिली जावी. "हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा, जशी आम्ही केली होती," असे त्यांनी म्हटले. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला होता. कर्ज काढून पीक घेतले होते, तेही गेल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. पुढील हंगामाची तयारी कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी त्यांची भूमिका आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola