Manoj Jarange Protest Mumbai : मनोज जरांगे यांच्या उपोषणाची वेळ सरकारला अडचणीची

Manoj Jarange Protest Mumbai : मनोज जरांगे यांच्या उपोषणाची वेळ सरकारला अडचणीची

२० जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत.. बीडमधल्या सभेतून जरांगे पाटलांनी ही घोषणा केलीय..दरम्य़ान मनोज जरांगेंनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला नाही तर भाजप आणि टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते...एकीकडे  २२ जानेवारीला राम मंदिराचा सोहळा आणि दुसरीकडे जरांगेंचं आमरण उपोषण सरकारला डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पावलं उचलेल अशीही शक्यता वर्तवली जातेय... तर टाटा मॅरेथॉनची सांगता २१ जानेवारीला आझाद मैदानात होणार आहे.. त्यामुळे जरांगेंचं आमरण उपोषण टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी अडचणीचे ठरण्याची दाट शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola