Man-Leopard Conflict: ‘...लोक वैतागले आहेत’, 50 बिबटे Vantara मध्ये पाठवणार, Ajit Pawar यांची घोषणा
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील (Pune District) बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची बैठक घेतली. 'अनेक लोक अतिशय त्रासून गेलेले आहेत, वैतागले आहेत,' असे अजित पवारांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितल्याची माहिती दिली. या बैठकीत मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. पुणे जिल्ह्यातील ५० बिबटे गुजरातमधील जामनगर येथील 'वनतारा' (Vantara) प्रकल्पात पाठवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे. शिरूर (Shirur) येथे २०० बिबट्यांसाठी नवीन रेस्क्यू सेंटर (Rescue Center) उभारण्यात येणार असून पिंजरे खरेदीसाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सौर कुंपण आणि दिवसा वीजपुरवठा देण्याचाही निर्णय झाला. निवृत्त वनाधिकारी अशोक खेडसे यांची या कामासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement