Majha Maharashtra Majha Vision 2021: रोजगाराला प्राधान्य हेच आपलं औद्योगिक धोरण : Subhash Desai
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2021 07:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Maharashtra Majha Vision : कोरोनाकाळात आम्ही जीवरक्षणाला सर्वोच्च महत्व दिले. मात्र, या काळात अर्थचक्र थांबू नये यासाठीही प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय टाळेबंदीनंतरही एप्रिलमध्ये महाराष्ट्राने उद्योगधंद्याना परवानगी देऊन रोजगार जावू दिले नाही. रोजगारांना प्राधान्य हेच आपले उद्योग धोरण आहे. फक्त महसूल मिळावा यासाठी उद्योगधंदे निर्माण करायचे नसून नवीन रोजगार निर्मिती करण्यावर आपला भर आहे, अशी भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात मांडली.