Maharashtra Unlock Guidelines: अनलॉकची नवी नियमावली जाहीर, या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल ABP Majha

#Maharashtraunlock #Maharashtraunlockguidelines #MaharashtraCoronavirus #ABPMajha

मुंबई : राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली आज जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परवा म्हणजे 4 ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. 

राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.  त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे. 

उर्वरित जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुकान उघडली जातील तर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. रविवारी केवळ अत्यावश्यस सेवेची दुकानेच सुरु राहतील. वॉकिंग सायकलिंग आणि एक्ससाइजसाठी गार्डन्स मैदाने उघडे राहतील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola