Election Maharashtra : 18 महानगरपालिकांची ओबीसी आरक्षण वगळून मार्च अखेरीस निवडणूक?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातल्या 18 महापालिकांची मार्चअखेरीस निवडणूक घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं केलीय. मुंबई आणि औरंगाबाद वगळून अन्य 18 महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याची तयारी आयोगानं सुरु केल्याचं कळतंय. ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केल्यानं आरक्षणाचा तिढा निर्माण झालाय. या जागा खुल्या प्रवर्गात गणल्या जाणार आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकी माहितीसह संपूर्ण प्रस्ताव तयार करून 06 जानेवारी रोजी निवडणूक आयुक्तांना सादर करावा, असे आदेश आयोगानं महापालिकांना दिलेत. एकीकडे मध्य प्रदेश सरकारप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारनं केलाय. मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगानं तिथल्या निवडणुका रद्द केल्यात. त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळातील ठरावाबाबत राज्य निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. त्यात आयोगानं 29 डिसेंबरला काढलेल्या आदेशामुळे आता नवा संभ्रम निर्माण झालाय.