Maharashtra Schools : प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर
आता समस्त विद्यार्थीवर्गासाठी आनंदाची बातमी.. सुट्टी कधी लागणार या बच्चेकंपनीला सतावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेय. तर २०२२-२३ हे नवं शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार आहे. संपूर्ण राज्यातल्या शाळांमध्ये एकवाक्यता आणि सुसूत्रता आणण्याासाठी राज्य शासनानं हा निर्णय घेतलाय. आणि त्याचं परिपत्रकही शिक्षण विभागानं प्रसिद्ध केलंय. जून महिन्यातलं विदर्भाचं तापमान लक्षात घेता तिथल्या शाळा सुरू होण्याची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.