Bhiwandi Heavy Rain : भिवंडीलाही पावसाने झोडपलं, पाणी साचल्याने वाहन चालकांना त्रास

पालघरमधील सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, भातशेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून भिवंडी शहर आणि ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले आहे, ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. भिवंडी-कल्याण मार्गावरील भिवंडी बायपास येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने भिवंडी-कल्याण रस्ता बंद केला आहे. भिवंडी बायपास परिसरात एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. साईबाबा मंदिरापासून बायपासपर्यंत पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली आहेत, काही वाहनांना धक्का मारून बाहेर काढावे लागत आहे. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या भागात मागील दोन-तीन वर्षांपासून नाल्याला पूर आल्याने पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना त्रास होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola