Maharashtra Rains Superfast News : पावसाच्या सुपरफास्ट बातम्या : 20 AUG 2025 : ABP Majha

राज्यात पाऊस परिस्थितीचा वेगवान आढावा घेण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांत अतिवृष्टीमुळे एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे. पुरात वाहून, घर कोसळून, वीज पडून आणि भिंत पडून हे बळी गेले आहेत. दहा जण जखमी झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा भागात झालेल्या पावसामुळे अनेक शेतात पाणी शिरले आहे. काही भागांमध्ये शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा, मोसंब आणि फळभाज्यांचे पीक पाण्याखाली आले असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कोल्हापूरच्या गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद झाला. यामुळे एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला. घोडबेटमध्ये राहणारी सत्तावीस वर्षांची गर्भवती महिला मात्र बचावली असून, तिच्यावर सिटी आर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. साताऱ्यातील संगमहौली परिसरातील कैलास स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या स्मशानभूमीतील सर्व अग्निकुंड पाण्यात गेल्यामुळे येथे अंत्यविधी करता येणार नाहीत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola