Maharashtra : नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

आज दिवसभरातील सर्वांत मोठी बातमी... राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलाय... यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल...  १० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल... हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे... सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola