Maharashtra Monsoon : जुलै महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाची ऑगस्ट महिन्यात दडी, बळीराजा संकटात
जुलै महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पिकांचं काय होणार याच्या चिंतेत आहे. राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान 10 टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यभरातील नगदी पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांवर पुन्हा एक नवं संकट आलं आहे.