Maharashtra : राज्यात निर्बंध शिथिल होणार? राज्य सरकार आणि टास्क फोर्स यांच्यात उद्या बैठक
राज्य सरकार आणि टास्क फोर्स यांच्यात उद्या बैठक पार पडते आहे. निर्बंध शिथिल करायचे की नाही? याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील ९० टक्के घरच्या घरी बरे होतायेत, त्यामुळं ९० ते ९५ टक्के बेड्स शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल, निर्बंध शिथिल करायचे की नाही? हा निर्णय टास्क फॉर्सच्या सल्ल्यानुसारच होईल असं टोपे यांनी स्पष्ट केलंय.