Maharashtra Civic Polls: 'एकाच कुटुंबात शेख, कांबळे, जैन?', सदोष मतदार याद्यांवरून विरोधक आक्रमक
Continues below advertisement
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, आज दुपारी ४ वाजता राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. या घोषणेआधीच मतदार याद्यांमधील त्रुटींवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामधे शेख, कांबळे आणि जैन अशी एकाच कुटुंबातली नावं आहेत, हे सगळं चित्र भयंकर आहे,' असा गंभीर आरोप करत, याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही दीर्घकाळ रखडलेल्या निवडणुका आता झाल्याच पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने आज घोषणा होणे अपेक्षित आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement