Maharashtra Local Bodies Election : मनपा आणि झेडपी निवडणुका पावसाळ्यात की पावसाळ्यानंतर?

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मोकळा झाला. त्यामुळे रखडलेल्या निवडणुका आता कधी होणार याची उत्सुकता आहे. पूरस्थितीमुळे निवडणूक पावसाळ्यानंतरच घ्यावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय. तशी मागणी ते राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहेत. तर तातडीनं निवडणुका घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. त्यामुळे मनपा आणि झेडपी निवडणुका पावसाळ्यात की पावसाळ्यानंतर होणार याची उत्सुकता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram