Maharashtra Heat Wave : राज्यात उष्णतेची लाट, जाणून घ्या काय काळजी करावी ABP Majha
सूर्याचा यूव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं सूर्याच्या अतीनील किरणांची तीव्रता वाढली असल्याचं हवामान विभागाच्या (India Meteorological Department) वतीनं सांगण्यात आलं होतं. दरम्यान यामुळेच हवामानात उष्णता वाढली असून नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. ज्यामुळे जळगाव जिल्ह्यातही सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. तापमान तब्बल 42 अंशावर जाऊन पोहोचल्यानं सामन्यांना प्रचंड त्रास होत आहे. दरम्यान जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू देखील झाला आहे.