Maharashtra Flood : सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
राजू सोनावणे
Updated at:
28 Jul 2021 09:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरड कोसळून आणि महापुरामुळं महाराष्ट्रात अतोनात नुकसान झालंय...रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा यासह राज्यातल्या एकूण सात जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसलाय. आता या जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. नुकसानग्रस्तांसाठी आज मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. काल वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी राज्यात पुरामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यासंदर्भातला अहवाल आज होणाऱ्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.