Maharashtra Drought : Ajit Pawar VS Devendra Fadnavis यांचे दुष्काळावरुन आरोप प्रत्यारोप

महाराष्ट्राच्या डोक्यावर दुष्काळाचे ढग जमा झालेयत. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचे प्रचंड चटके सहव करावे लागताय. उसणवाऱ्या करून, कर्जकज्जे काढून पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या बागांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत माना टाकल्या आहेत. तर गावागावांमधील रस्त्यांवर बाया-बाप्ये, कच्चे-बच्चे डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी धावताना दिसतायत. गावात टँकर आला रे आला की ग्रामस्थांची त्याच्याभोवती मुरंकड पडतीय. तर ज्याच्या भरवशावर गावांची तहान अवलंबून आहे, त्या धरणांचा तळ आता उघडा पडलाय. कधीकाळी पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या या जलाशयांमध्ये आता फक्त दिसतायत खडक आणि चिखल...

राज्यातील १९ जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. जवळपास ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. मात्र राज्य सरकारचं तिकडं लक्षच नाही. आम्ही या प्रश्नाकडं सरकारचं लक्ष वेधत आहोत. तरीही सरकार जागं झालं नाही, तर इतर मार्ग आहेत, असा इशारा शरद पवार यांनी आज दिला. तर विरोधक नकारात्मक मानसिकेत गेला असून, राज्य सरकार दुष्काळाबात गंभीरपणे पाहत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola