Maharashtra Coronavirus : लवकरच 'महा' दिलासा? महाराष्ट्र लवकरच पूर्ण अनलॉक होणार?
महाराष्ट्रात येणाऱ्या काळात निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता आहे. याचं कारण काल राष्ट्रवादीच्या बैठकीत दुकानं आणि हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा आणखी वाढवण्याचा सूर होता.. बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळा वाढवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्यास लवकरच महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होण्याची शक्यता आहे.